Showing posts with label Marathi stories. Show all posts
Showing posts with label Marathi stories. Show all posts

Friday, August 3, 2018

गाव ...! A village life

मित्रांनो नमस्कार!

आज पुन्हा एकदा लिहावेसे वाटले.
पण, कुठल्या मुद्यावर लिहावे, तेच कळेना. असाच विचार मनात सारखा तग धरुन बसला होता. तेवढ्यात मित्रांसोबत गप्पा मारताना मित्रांनीच विषय काढला. तो म्हणजे “आपलं गाव”. तेव्हाच वाटले, गावच्या राहनिवरच लिहाव. नाही का?
विषय तर “लई झ्याक” आहे. आता म्हणाल, “लई झ्याक” हे काय?

हो, गावा बद्दल लिहायचे म्हणजे थोडी फार, गावची भाषा पण हविच ना! कदाचित, हें दोन शब्द वाचल्यावर, तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेच असेल.

हा लेख लिहायचं कारण असे की, नोकरी साठी गावची बरीच लोकं शहरात राहतात. त्यातला मी एक. इथे राहताना मात्र क्षणा-क्षणाला गावंची आठवण ही येतेचं. गावात राहणार्यांना वाटते शहरात राहने म्हणजे खूपच मोठे. पण खरे सांगू, शहरात राहणे म्हणजे, स्वतः हरवून बसने. शहरात फक्त पैसा मिळतो. बाकी सर्व काही येतं, ते गावातूनच.

तर कसं, आपलं गाव लइ झ्याक हाय! 😃😃...

आता, मूळ विषयावर यावं म्हणतो!

गाव - हे एक खूप मोठं कुटुंब आहे. इथेच, या गावात तुम्हाला सर्वकाही पाहायला मिळते. गाव पूर्ण रंगरंगोटी ने भरलेला असतो. आजही गावातील लोकांची सुरुवात कोंबडा अरवला की होते. गावच्या लोकांना लवकर उठुन रानात जायची खूप गडबड असते. असणार तर! शेत - रान यावर खूप लक्ष्य द्यावे लागतं. खरे म्हणजेे खूप कष्ट असतात रानात.
तेव्हा कुठेतरी आपल्या सर्वांना खायला अन्न मिळते. पण त्यासाठी एकच माणूस कष्ट करतो. आणि तो म्हणजे “शेतकरी”.

Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days, usache bharlele tractor

सकाळी सकाळी उठून रानात जाणे खूपच छान वाटते. तो हिरवा निसर्ग, झाडे-झुडपे, किलबिल करणारे पक्षी, सकाळचं कोवळं ऊन. यामुळे शेतकरी खूप सदृढ असतो. आणि त्यात रानात कष्ट करणे ते वेगळंच.  नाही म्हणजे, गावात राहिले कीे वेगळा असा व्यायाम करण्याची आवश्यकता फार कामी.




Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days,
माझे बालपण मला अजूनही आठवते. तो डाव मांडणे, खेळणे, भांडणे खूप मजा यायची. तुम्हाला आठवतं का हो? सायकलचं चाक घ्यायचं आणि गावभर हुंदडायचो. उसाचा ट्रॅक्टर आला रे आला, की त्याच्यामागे ऊस काडत शाळेतील निम्मी पोरं पळायची. आता आपण उसाचा रस पितो, पण ऊस काडून तोंडाने खाण्याची मजा काय निराळीच आहे. आठवत असेल ना तुम्हाला, तो शाळेचा पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. प्रार्थनेला उभारलं की एकमेकांना ढकलणे, पुढच्या पोराचा शर्ट लिहून घाण करणे. घंटा वाजली की पळत सुटणे. किती मस्त दिवस होते.

आजही आठवते की आपण खाऊ घेण्यास  चार अणे, आठ आणे घेऊन यायचो.
हसू येतं ना. मलाही.
जरासा उन्हाळा चालू झाला, की सगळी पोरं विहिरीवर. इर्षेवर पोरं विहिरीचा गाळ शिवून यायची. पाक टोकावरून उड्या ठोकायची.

एकदा तर गंमतच झाली. मी, माझा भाऊ आणि सवंगडी विहिरीवर पोहायला गेलतो. बाजूलाच एक आंब्याचं झाड व्हतं.     आम्ब नुसता लकडली व्हती. मग विचार कसला. घेतली दगडं रानातली आणि लइ आम्ब पाडली.



तेवढ्यात, तिकडून आवाज आला. आरं आरं थांब. बघतो तर काय, राणाचा मालक काठी घेऊन आमच्याच कडे येत व्हता. आता काय, सगळेच पोरं पळ्त अशी सुटली की जणू मागे काय वाघच लागला आहे. पण तो धिप्पाड माणूस काही वाघापेक्षा कमी नव्हता. त्यात आम्ही टुकार पोरं! आम्ही कशाला ऎकतोय. काढलेले आंबे टाकून पळत सुटलो, तेही पाणी पाजलेल्या उसातून, खोलवर पाय रूतवत. धापा टाकत. काय मजा होती हे सगळे करण्यात.


हे सगळं आठवलं की वाटतं, द्यावं सगळं सोडून आणि जाऊ गावाकडे.
जाऊ रानात जांभळं तोडू, चिंचा पडू, मस्त मित्रांसोबत
बसू कट्यावर एकमेकांना खिजवत, चिडवत.
अजूनही, तो आमचा दररोजचा कट्टा आठवतो. जेवन झालं की सगळी आम्ही गल्लीतली पोरं तिकडेच. तिथे whatsapp पेक्षा लवकर गावातल्या घडामोडी कळायच्या. आठवत असतील ना तुम्हाला तुमचे कट्यावरचे मिञ. रात्रीची शेकोटी करून बसलेले.

ते वेगवेगळे गावठी खेळ अजूनही खेळावेशे वाटतात. भौरा, गोट्या, विठी दांडू, गलोरी, लपंडाव, कुस्ती, खो-खो, अजून बरीच. किती मस्त मैदानी खेळ होते ते. लहानपणी हेच खेळ खेळल्यामुळे वातावरणात थोडा फार फरकाने शरीराला कसलीच इजा होत नाही.



पण आत्ताच्या पिढीला, हवा पाणी जरा बदलले की लगेच सर्दी, ताप, खोकला असतोच. हे सगळे, मातीचा संबंध कमी झाल्यामुळे होते. म्हणून गाव निराळेच आहे.


गावातील वैशिष्ट्य म्हणजे सगळीच लोकं एकमेकांना ओळखत असतात. प्रत्येकाच्या घरी उठणं बसणं असत.


घरात कुठला तरी नवीन पदार्थ बनला ली लगेच थोडे शेजारी दिले जाते. गावात काहीही होउदे, पूर्ण गाव जमा होतो मदत करायला. आजही मी गावी गेलो की मला ऐकन्यास खूप बरे वाटते की “अरे बाळ कदि आलास, बरा आहेस ना? मी म्हणतो “हो काका बरा आहे मी, तुम्ही कसे आहात?” किती आपुलकी आहे गावात. नाही का?

पण हे सगळे शहरात पहायला देखील मिळत नाही. दूरवर जाऊदे आपल्या शेजारी कोण राहतो हे आपल्याला माहीत नसते. मदत.. ती तर खूपच लांबची गोष्ट. या कामामुळे बरीचं लोकं आपले राहणीमान, आपलं मूळ विसरत आहेत. शरीर दिवसेंदिवस नाजूक होत चालले आहे. आपली माणसे आपण मागे ठेवून जात आहोत.  आपल्या सवंगद्याना विसरत चालतोय आपण.

हा हिरवा निसर्ग, स्वछ हवा,
मिळणार नाही कुठे,
गावंच आहे एकमेव ठिकाण,
तिथे तुम्हाला मिळेल स्फूर्ती छान!
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

गावात आहे आपुलकी,
खूप प्रेम खूप नाती,
सर्व येई मदती,
जेव्हा संकट येई,
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

  • - प्रशांत सुरेश देवमोरे.

Sunday, July 15, 2018

पर्यावरण

पर्यावरण

हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.


मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे ‘परीचे आवरण’. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे. पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
Save trees and save water...!


हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर,  वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे…! हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून “पर्यावरण”.



किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो. आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात. पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.


पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे. आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो. पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!


फक्त काळजी घेऊ शकतो. तेही आपण नाही करत. इतका मोठा निसर्ग, मनाने पण खूप श्रीमंत आहे. तो आपल्या कडे मागतही काहीच नाही. फक्त इतकेच सांगतो की, काळजी घ्या.

पण, आपण काय करतो …. विध्वंस, ऱ्हास या सगळ्याचा.


जरा विचार करा, आपली जरा प्रकृती बिघडली की लगेच वैद्यकीय उपचार घेतो. हा निसर्ग कोणाकडे जाणार. त्याचा वैद्य कोण? कोण करणार उपचार या पृथ्वीवर वसलेल्या निसर्गाचे? पडला ना प्रश्न!


आपण, स्वतः चांगले दिसण्यासाठी बरेचकाही करतो, भरपूर पैसेही खर्च करतो. पण जो आपल्याला अन्न, पाणी, हवा या जीवनावश्यक गोष्टी देतो, आपण त्याची काळजीच घेतं नाही. आपले आई वडील आपली काळजी घेतात, प्रियकर प्रेयसीची काळजी घेतो, नोकरदार आपल्या मालकाची काळजी घेतात, पण कोणच या निसर्गाची कदर करत नाही. जितके याला लुटता येईल तेवढा लुटतो. आजचा माणूस किती स्वार्थी आहे हो…! हो ना?


जरा विचार करा, निसर्ग प्रदूषित होत चालला आहे, हवा पाणी दूषित होत आहे, रोगराई वाढत आहे, समुद्राची पाण्याची पातळी वाढत आह.

आपण हा दूषित निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? कदाचित येणाऱ्या या प्रदूषनामुळे पुढची पिढी अपंगच या दुनियेत येतील. त्यांच्यासाठी, हा खरेच केवळ त्यांच्यासाठीच आपणास काळजी घ्यावी लागेल… या निसर्गाची, प्रेयसी प्रमाणे प्रेम करावे लागेल, या मुक्या निसर्गावर… तेही तात्काळ, या क्षणापासून. कदाचित येणाऱ्या पिढीला हा निराळा, निसर्ग बागायला मिळणार ही नाही.


मित्रानो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या काळात आपण सदृढ राहणार असाल तर आता आपल्याला निसर्गाची मदत करावी लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर, तुम्हाला माहीतच आहे, निसर्ग खवळला की तो कुणालाही सोडत नाही! तो कुणाचा धर्मही पाहत नाही. तो फक्त संपवून टाकतो. तेही एका क्षणार्धात!


त्यासाठी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वापरू नका, झाडे लावा - हवा स्वच्छ होईल, पुरापासून सवरक्षण मिळेल, पाणी जिरवा - भुतालची पाण्याची पातळी वाढेल, जमीन थंड राहण्यास मदत होईल.


आता आला आहे पावसाळा,
धरा ध्यास मनाला,
एक संग व्हा आता,
झाडे लावा आणि पाणी जिरवा,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।

असे हे रंगबिरंगी जग,
नाही भेटणार दुसरे,
निसर्ग सौंदर्य परत मिळवण्यासाठी,
गरज आहे सध्या एकजुटीची,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।


प्रशांत सुरेश देवमोरे

  • जर लेख आवडला असेल तर मित्रानो subscribe करा...



Friday, February 23, 2018

एक सुंदर पहाट

एक सुंदर पहाट

नमस्कार मित्रांनो…!

मी प्रशांत. परवाच मी पहाटेचा प्रवास करीत होतो. तेव्हा अनुभवलेल्या गोष्टी मी तुम्हास सांगू इच्छितो.

मी कोल्हापूरकरच. तेच कोल्हापूर जे सार्-यांना आपलेसे करतं. माझी मायभूमी म्हणजे कोल्हापूर. खुप दिवसांनी आज पून्हा परतीचा प्रवास. खरेच कामावरून परत आपल्या राहत्या घरी जाणार, आज पुन्हा आपल्या सवंगडयांना, आपल्या जवळच्या माझ्या माणसांना भेटणार या भावनेनेच, मन एकदम उत्साहाने फुलून आले.
जीवनात काहीतरी करून दाखवायच्या जिद्दीने मी सुद्धा कामाच्या शोधात भरपूर फिरत असतो. त्या दिवशीही मी असेच बाहेर गावाहून परतीचा प्रवास करत होतो. भरपूर दिवस घरापासून, आपल्या माणसानं पासून दूर राहिल्या मुळे, कधी एकदा घरी पोचतो असे झाले होते. कधी एकदा सर्वाना भेटतो हीच इच्छा मनाला लागून राहिली होती. जे बाहेर गावी राहतात, त्यांना हीच ओढ मनाला लागून राहिलेली असते. लहानपणीचे ते दिवस आठवले की मन अगदी भरून येत.



तो डाव मांडणे आणि पूर्ण दिवस भर, उन्हात उनाडक्या करणे यातच दिवस संपायचा. कदि झाडावरून आंबे तोडून पळून जाणे तर कधी विहिरीत इर्षे वर अगदी टोका वरून उड्या मारणे. खरच काय दिवस होते ते. आता फक्त काम आणि काम. आजकाल तर, या मोबाइल च्या जगात सर्व काही मोबाइल मधेच होते. पण आपल्या तरुण पीडिला हे कळत नाही की जोपर्यंत व्यायाम करत नाही तोपर्यंत आपल्या शरीराची रचना नीट राहत नाही.

जाऊदे मूळ गोष्टी वर येऊ. नाहीतर आठवणी कितीही काढली तरी ती संपत नाही.

तर् मित्रांनो, परवाच मी परतीचा प्रवास करत होतो. ती वेळ होती प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीची. प्रजासत्ताक दिन शुक्रवारी असल्यानं बऱ्याच लोकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुट्या दिल्या होत्या.त्यामुळे बस स्थानकावर खूप गर्दी. काहींना तर जागाच मिळेना. शेवटी खूप याचने नंतर, बस मधून उभे राहून येण्याची परवानगी मिळाली तेही पूर्ण तिकीट काडूनच.

मला कधीही रात्रीचा प्रवास करायला आवडतो. उन्हाची दगदग नसते आणि गर्दीही कमी असते. रात्री नउ चा ठोका होता. भूक तर खूप लागली होती. पण बसची वेळ झाली होती म्हणून बिस्कीट वर वेळ मारुन नेली. आमची गाडीही इतक्यातच भरली आणि मार्गाला लागली.

हिवाळा चालू होता, म्हनून जास्तच ठंडी पडली होती. याच ठंडीत बस कोल्हापूर बस स्थानकावर पोचली तीही पहाटे आडीच च्या पहारास.

कोल्हापुरातून घर थोड्या अंतरावर असल्याने मी पुढच्या बसची वाट पाहत राहीलो. तीही बस साडे पाच ला होती म्हणून मीही बस स्थानकावर फिरत राहीलो.

बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्यांची अफाट गर्दी सुटली होती. सगळ्या प्रवाशांनी एकच अक्रोश केला होता, या कापत्या थंडीला दूर करायला एकच कप चहाचा प्याला. कित्येक जणांनी शेकोटी पेटवल्या होत्या. ठंडी पासुन अगदी तात्पुरत्या सूटका  व्हावी म्हनून.

बस स्थानकावर पाहतो तर काय, अगदि अडीच वाजल्यापासूनच पोहे, चहा आणि नाष्टा तयारच होता. एवढ्या कडाक्याच्या थंडीत, रात्रभर जागून प्रयत्नांची पराकाष्ठा करने हे मला तर कधी उभ्या आयुष्यात जमले नसते. खरेच या प्रयत्नांना २१ तोफांचा सलाम.

इतक्या जबरदस्त थंडीत आमचे तर हात पाय कापायला लागले होते पण इतके असून पण, पूर्ण तयारी करून रात्रभर जागरण करून, पूर्ण खाद्य पदार्थ बनवणे तेही काही चेष्टा नाही भाऊ. आमचे दोन्ही हात खिशात थंडी सहावेना.

अगदी प्रत्येक जण दोन तीन वेळा चहा घेत होता. बस इतकेच बोलायचे होते. या मेहनतीला दाद मिळायला हवी. माहीत आहे असे वाटते की अर्धा विषय आपण बोललो. काही तरी शिलक ठेऊ, पुढच्या वेळी साठी. कोल्हापूर मध्ये अशी ही सुंदर पहाट मी कधीच पहिली नव्हती. तर चला मित्रांनो परवानगी द्यावी.

मित्रांनो शब्दांची मांडणी अवडलली असेल तर हा ब्लॉग subscribe करा आणि खाली comments मधे नवीन विचार सुचवा.

Latest article

What are the pros and cons of web hosting companies in Marathi?

2019 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब होस्टिंग सुविधा कोणती कंपनी देते? जगभरातील सर्वोत्तम वेब होस्टिंग कंपन्यांची  तपशीलवार माहिती आणि त्यांचे फा...