Sunday, January 13, 2019

M-Indicator... एक मार्गदर्शक...।

M-Indicator... एक मार्गदर्शक...।

मित्रांनो नमस्कार....
आज बऱ्याच दिवसांनी लिहावेसे वाटले. तेही माहिती तंत्रज्ञानाबद्दल . वाटले ना काहीतरी वेगळे.

मला आज तुमच्या सोबत एम - इंडिकेटर बद्दल बोलायचे आहे. हे मुंबई  सारख्या मेट्रो सिटीत राहणारया मित्रांसाठी काही नवीन नाही. पण आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. भरपूर जणांना एम - इंडिकेटर माहीत असेलच. तरीही एक आढावा घेऊ.

तर मित्रांनो, एम- इंडिकेटर हे एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. आपली मुंबई खूप मोठी आहे. मुंबई मध्ये काम असल्यास आपल्याला लोकल ट्रेन ने प्रवास हा करावाच लागतो. क्षणभर ही विलंब न करता लोकल ट्रेन ह्या येत राहतात. त्यामुळे मुंबईत आलेल्या नवख्या माणसाला दिशा आणि वेळ समजायला खूप वेळ लागतो. काहीवेळा तर आपण भलतेच कुठे वेगळी कडे जातो. माझ्यामते हा अनुभव बरयाच लोकांना आलाही असेल,  हो ना ...!.

त्यासाठी मुंबईची आपली माणसं मदत करतातच. तरीही आपला वेळ वाचवण्यासाठी सतर्क राहने कितीतरी चांगले, नाही का..!

त्याचसाठी, मुंबई, दिली आणि पुणे ह्या शहरात एम - इंडिकेटर ची सुविधा आहे.

आता भरपूर झाले कारण. आता मूळ विषय बद्दल बोलू. नाहीतर तुम्ही म्हणाल काय बकवास करतोय  मगाचपासून.☺☺☺

 तर मित्रानो, एम इंडिकेटर मधे लोकल ट्रेनचे वेळापत्रक असते. ते एक सॉफ्टवेअर असलेने आपण आपले जायचे ठिकाण फक्त टाकावे लागेल. हेच सॉफ्टवेअर आपल्याला लगेच लोकल ट्रेन ची वेळ आणि कुठल्या स्टेशन वरन बदलावायची असेल ते देखील दर्शवते. उदाहरण म्हणून मी खाली दिले आहे.

तितकेच नाही, बस सुविधा, S.T.  महामंडळाच्यासुविधा, हॉटेल्स, टॅक्सी, नोकरी संदर्भात जाहिराती, फेरी बोट, स्वतः ची जाहिरात, इतर एक्सप्रेस ट्रेन, रिक्षा सुविधा ...!
आशा कित्येक सुविधा या एका एम इंडिकेटर मध्ये आहेत.
म्हणून च मी म्हणतो हा सॉफ्टवेअर कमी आणि आपला मार्गदर्शक जास्त आहे.

M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...।      M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...। M-Indicator... एक मार्गदर्शक...।   M-Indicator... एक मार्गदर्शक...।      M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...।

तरी मुंबई, पुण्यात जाण्यारया सर्व मित्रांनी ह्याचा अनुभव घ्यावा. तुम्हला  हा लेख जर आवडला असेल तर नक्की आपल्या ईतर मित्रांना पाठवा आणि या ब्लॉग ला subscribe करा.👍👍

Wednesday, October 3, 2018

वेडं प्रेम...

।...वेडं प्रेम...।

मनात तू , 
कल्पनेत तू , 
वाऱ्याच्या मंद स्पर्शात तू,
मग का वेगळी झालीस ग तू...!

सुखात तू दुखत तू,
माझ्या वेड्या मनाचा ध्यास तू,
माझ्या प्रेमवेड्या हृदयातील धक धक तू,
इतके असून पण का वेगळी झालीस तू...!

अंतःकरण तुटले माझे,
तीळ तीळ मन जळले  माझे,
आता काही उरले नाही,
जवळ तू राहिली नाही...!

काय करावे कळेना आता
कोणाशी काय बोलावे,
उमजेना आता,

खरच काही कळत नाही,
का डाव मोडलिस तू,
जोड जमायच्या आदी,
मनाला माझ्या विरहात टाकलीस तू...

खरेच, हेच होते का ग प्रेम,
याच साठी दिलास का वेळ,
गेलीस तू सोडून,
नातं सगळे तोडून...!

पण आठवण तर येतच राहील,
मनाच्या कोपर्यात, हृदयाच्या कप्प्यात,
तुझी जागा तशीच राहील...!

...प्रशांत सुरेश देवमोरे…!


आठवण...

marathi kavita, prashant devmore, poem on athvan, prem kavita, shabd mhnaje sarv kahi, athvanichya sagara
नुसती  आठवण जवळ ठेऊन,
त्रास सहायला, नाही मला नाही झेपत…!

काही गौम्य नसतानाही,
वेळ खर्च करण्यात,
मला नाही पटत…!

हेही माहीत आहे,
आठवणी काढल्या तर,
क्षण किती सुंदर होते...
पण,
त्या सुंदर आठवणींच्या परिकल्पना जोपासणे
हेही नाही झेपत…!

शेवटी आठवण ही आपलीच असली,
तरीही, ती सत्य बनून पुढे येणार्यातली नाही,
म्हणून, त्यात मौल्यवान असा काळ हातातून गमालयास,
माझ्या व्यवहार ज्ञानाला झेपत नाही…!

खरे आहे सगळे,
खूप छान होता वेळ,
त्यात तुझ्या गोड सहवासाने,
खेळला होता खूप खेळ…!

पण तो होता …
आणि ….आता तो नाही,
तो परत मिळवण्यासाठी,
अर्थ व प्रयत्न लागले कमी,
का आणि कसे,
कळेना काही,

आता ह्या मैदान मोकळ्या आयुष्यात,
प्रेम तर राहिल मनातच ...

पण मैदान सोडणे,
आपल्या जन्मदात्याला खपणारे नाही,
आपण असतानाही त्यांच्या नयनी अश्रु देखील शोभणारे नाहीत,

म्हणून...जीवनाचा हा गाडा न्यायचा आहे शेवटपर्यंत,
प्रेम होते आणि ते राहील ही ,
पण सहवास राहणार नाही शेवटपर्यंत,

राहतील त्या फक्त आठवनी….

म्हणून म्हणतो,
सारखी आठवन काडू नकोस,
त्रास मनाला देऊ नकोस,

पुढे चालत राहा तू,
तुझेही आयुष्य जगत राहा तू,
नवीन उमेद, नवी स्वप्ने पाहत राहा तू,

कुठे ना कुठे तरी होईलच टक्कर,
तेव्हा, ठरवू आठवणींचे हे चक्कर...
विचारू जाब एकमेकांना,
आठवनीत हरपणे छान होते,
कि प्रेम मनी असने छान होते,

...प्रशांत सुरेश देवमोरे…!

आठवणीच्या सागरा....Athavanichya Sagara Marathi Poem in 2019

आठवणीच्या सागरा....

असा का छळतोस मला,
बनून लाटा,
का आपट्टतोस किनाऱ्यावर माझ्या....

marathi kavita, marathi poem, athavn, prem, samudra, poem on sea, Marathi poem on sea, manatalya gosti, man, divas ratr

एका पाठोपाठ एक,
आठवण करून देतोस,
मनाची प्रत्येक जखम,
ताजी करून जातोस....

दिवस रात्र हा खेळ,
असाच चालू ठेवतोस, 
मनाला माझ्या हसून आणि रडूऊन सुद्धा जातोस....

भरती ओहोटी सोबत,
ऊन साउली ची आठवण करून देतोस
तुझ्याशिवाय अपूर्ण असल्याची जाणीव करून देतोस....

- सुरभी जालंदर देवमोरे

सह्याद्री पर्वतरांग...sahyadri Parvat...


Sahyadri Parvat

सौंदर्य वाढवत तिचे , 
ढग पांघरतो शाल.....
बरसुन पाऊस, 
या धरणीला करतो थंडगार..... 

निसर्गाला साथ ह्या, 
प्राणी पण देतात......
नाचून फुलवून पिसारा, 
शोभा खुप वाढवतात.... 

बघून असा सुंदर नजराणा, 
डोळे तुप्त होतात..... 
निसर्गाचा हा ठेवा, 
ह्दयात साठवून ठेवतात.....

 उंच आहे इतका,
की आभाळ ठेंगण वाटतं.....
नेसून हिरवा शालू,
मनी उत्कर्ष वाढवतं.....

जागोजागी वसल्या आहेत पानसऱ्या,
मोठा तो धबधबा....
घर आहे हे खूपशा प्राण्यांचे,
म्हणून वाघ-सिंहाचा असतो इथे दबदबा....

कडे-कपारी आणि अगडबंब दगड,
ठेवतात त्याचा मान....
नाव आहे त्याच,
सह्याद्री पर्वतरांग....

-सुरभी जालंदर देवमोरे...

Friday, August 3, 2018

गाव ...! A village life

मित्रांनो नमस्कार!

आज पुन्हा एकदा लिहावेसे वाटले.
पण, कुठल्या मुद्यावर लिहावे, तेच कळेना. असाच विचार मनात सारखा तग धरुन बसला होता. तेवढ्यात मित्रांसोबत गप्पा मारताना मित्रांनीच विषय काढला. तो म्हणजे “आपलं गाव”. तेव्हाच वाटले, गावच्या राहनिवरच लिहाव. नाही का?
विषय तर “लई झ्याक” आहे. आता म्हणाल, “लई झ्याक” हे काय?

हो, गावा बद्दल लिहायचे म्हणजे थोडी फार, गावची भाषा पण हविच ना! कदाचित, हें दोन शब्द वाचल्यावर, तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेच असेल.

हा लेख लिहायचं कारण असे की, नोकरी साठी गावची बरीच लोकं शहरात राहतात. त्यातला मी एक. इथे राहताना मात्र क्षणा-क्षणाला गावंची आठवण ही येतेचं. गावात राहणार्यांना वाटते शहरात राहने म्हणजे खूपच मोठे. पण खरे सांगू, शहरात राहणे म्हणजे, स्वतः हरवून बसने. शहरात फक्त पैसा मिळतो. बाकी सर्व काही येतं, ते गावातूनच.

तर कसं, आपलं गाव लइ झ्याक हाय! 😃😃...

आता, मूळ विषयावर यावं म्हणतो!

गाव - हे एक खूप मोठं कुटुंब आहे. इथेच, या गावात तुम्हाला सर्वकाही पाहायला मिळते. गाव पूर्ण रंगरंगोटी ने भरलेला असतो. आजही गावातील लोकांची सुरुवात कोंबडा अरवला की होते. गावच्या लोकांना लवकर उठुन रानात जायची खूप गडबड असते. असणार तर! शेत - रान यावर खूप लक्ष्य द्यावे लागतं. खरे म्हणजेे खूप कष्ट असतात रानात.
तेव्हा कुठेतरी आपल्या सर्वांना खायला अन्न मिळते. पण त्यासाठी एकच माणूस कष्ट करतो. आणि तो म्हणजे “शेतकरी”.

Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days, usache bharlele tractor

सकाळी सकाळी उठून रानात जाणे खूपच छान वाटते. तो हिरवा निसर्ग, झाडे-झुडपे, किलबिल करणारे पक्षी, सकाळचं कोवळं ऊन. यामुळे शेतकरी खूप सदृढ असतो. आणि त्यात रानात कष्ट करणे ते वेगळंच.  नाही म्हणजे, गावात राहिले कीे वेगळा असा व्यायाम करण्याची आवश्यकता फार कामी.




Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days,
माझे बालपण मला अजूनही आठवते. तो डाव मांडणे, खेळणे, भांडणे खूप मजा यायची. तुम्हाला आठवतं का हो? सायकलचं चाक घ्यायचं आणि गावभर हुंदडायचो. उसाचा ट्रॅक्टर आला रे आला, की त्याच्यामागे ऊस काडत शाळेतील निम्मी पोरं पळायची. आता आपण उसाचा रस पितो, पण ऊस काडून तोंडाने खाण्याची मजा काय निराळीच आहे. आठवत असेल ना तुम्हाला, तो शाळेचा पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. प्रार्थनेला उभारलं की एकमेकांना ढकलणे, पुढच्या पोराचा शर्ट लिहून घाण करणे. घंटा वाजली की पळत सुटणे. किती मस्त दिवस होते.

आजही आठवते की आपण खाऊ घेण्यास  चार अणे, आठ आणे घेऊन यायचो.
हसू येतं ना. मलाही.
जरासा उन्हाळा चालू झाला, की सगळी पोरं विहिरीवर. इर्षेवर पोरं विहिरीचा गाळ शिवून यायची. पाक टोकावरून उड्या ठोकायची.

एकदा तर गंमतच झाली. मी, माझा भाऊ आणि सवंगडी विहिरीवर पोहायला गेलतो. बाजूलाच एक आंब्याचं झाड व्हतं.     आम्ब नुसता लकडली व्हती. मग विचार कसला. घेतली दगडं रानातली आणि लइ आम्ब पाडली.



तेवढ्यात, तिकडून आवाज आला. आरं आरं थांब. बघतो तर काय, राणाचा मालक काठी घेऊन आमच्याच कडे येत व्हता. आता काय, सगळेच पोरं पळ्त अशी सुटली की जणू मागे काय वाघच लागला आहे. पण तो धिप्पाड माणूस काही वाघापेक्षा कमी नव्हता. त्यात आम्ही टुकार पोरं! आम्ही कशाला ऎकतोय. काढलेले आंबे टाकून पळत सुटलो, तेही पाणी पाजलेल्या उसातून, खोलवर पाय रूतवत. धापा टाकत. काय मजा होती हे सगळे करण्यात.


हे सगळं आठवलं की वाटतं, द्यावं सगळं सोडून आणि जाऊ गावाकडे.
जाऊ रानात जांभळं तोडू, चिंचा पडू, मस्त मित्रांसोबत
बसू कट्यावर एकमेकांना खिजवत, चिडवत.
अजूनही, तो आमचा दररोजचा कट्टा आठवतो. जेवन झालं की सगळी आम्ही गल्लीतली पोरं तिकडेच. तिथे whatsapp पेक्षा लवकर गावातल्या घडामोडी कळायच्या. आठवत असतील ना तुम्हाला तुमचे कट्यावरचे मिञ. रात्रीची शेकोटी करून बसलेले.

ते वेगवेगळे गावठी खेळ अजूनही खेळावेशे वाटतात. भौरा, गोट्या, विठी दांडू, गलोरी, लपंडाव, कुस्ती, खो-खो, अजून बरीच. किती मस्त मैदानी खेळ होते ते. लहानपणी हेच खेळ खेळल्यामुळे वातावरणात थोडा फार फरकाने शरीराला कसलीच इजा होत नाही.



पण आत्ताच्या पिढीला, हवा पाणी जरा बदलले की लगेच सर्दी, ताप, खोकला असतोच. हे सगळे, मातीचा संबंध कमी झाल्यामुळे होते. म्हणून गाव निराळेच आहे.


गावातील वैशिष्ट्य म्हणजे सगळीच लोकं एकमेकांना ओळखत असतात. प्रत्येकाच्या घरी उठणं बसणं असत.


घरात कुठला तरी नवीन पदार्थ बनला ली लगेच थोडे शेजारी दिले जाते. गावात काहीही होउदे, पूर्ण गाव जमा होतो मदत करायला. आजही मी गावी गेलो की मला ऐकन्यास खूप बरे वाटते की “अरे बाळ कदि आलास, बरा आहेस ना? मी म्हणतो “हो काका बरा आहे मी, तुम्ही कसे आहात?” किती आपुलकी आहे गावात. नाही का?

पण हे सगळे शहरात पहायला देखील मिळत नाही. दूरवर जाऊदे आपल्या शेजारी कोण राहतो हे आपल्याला माहीत नसते. मदत.. ती तर खूपच लांबची गोष्ट. या कामामुळे बरीचं लोकं आपले राहणीमान, आपलं मूळ विसरत आहेत. शरीर दिवसेंदिवस नाजूक होत चालले आहे. आपली माणसे आपण मागे ठेवून जात आहोत.  आपल्या सवंगद्याना विसरत चालतोय आपण.

हा हिरवा निसर्ग, स्वछ हवा,
मिळणार नाही कुठे,
गावंच आहे एकमेव ठिकाण,
तिथे तुम्हाला मिळेल स्फूर्ती छान!
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

गावात आहे आपुलकी,
खूप प्रेम खूप नाती,
सर्व येई मदती,
जेव्हा संकट येई,
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

  • - प्रशांत सुरेश देवमोरे.

Sunday, July 15, 2018

पर्यावरण

पर्यावरण

हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.


मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे ‘परीचे आवरण’. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे. पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
Save trees and save water...!


हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर,  वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे…! हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून “पर्यावरण”.



किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो. आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात. पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.


पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे. आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो. पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!


फक्त काळजी घेऊ शकतो. तेही आपण नाही करत. इतका मोठा निसर्ग, मनाने पण खूप श्रीमंत आहे. तो आपल्या कडे मागतही काहीच नाही. फक्त इतकेच सांगतो की, काळजी घ्या.

पण, आपण काय करतो …. विध्वंस, ऱ्हास या सगळ्याचा.


जरा विचार करा, आपली जरा प्रकृती बिघडली की लगेच वैद्यकीय उपचार घेतो. हा निसर्ग कोणाकडे जाणार. त्याचा वैद्य कोण? कोण करणार उपचार या पृथ्वीवर वसलेल्या निसर्गाचे? पडला ना प्रश्न!


आपण, स्वतः चांगले दिसण्यासाठी बरेचकाही करतो, भरपूर पैसेही खर्च करतो. पण जो आपल्याला अन्न, पाणी, हवा या जीवनावश्यक गोष्टी देतो, आपण त्याची काळजीच घेतं नाही. आपले आई वडील आपली काळजी घेतात, प्रियकर प्रेयसीची काळजी घेतो, नोकरदार आपल्या मालकाची काळजी घेतात, पण कोणच या निसर्गाची कदर करत नाही. जितके याला लुटता येईल तेवढा लुटतो. आजचा माणूस किती स्वार्थी आहे हो…! हो ना?


जरा विचार करा, निसर्ग प्रदूषित होत चालला आहे, हवा पाणी दूषित होत आहे, रोगराई वाढत आहे, समुद्राची पाण्याची पातळी वाढत आह.

आपण हा दूषित निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? कदाचित येणाऱ्या या प्रदूषनामुळे पुढची पिढी अपंगच या दुनियेत येतील. त्यांच्यासाठी, हा खरेच केवळ त्यांच्यासाठीच आपणास काळजी घ्यावी लागेल… या निसर्गाची, प्रेयसी प्रमाणे प्रेम करावे लागेल, या मुक्या निसर्गावर… तेही तात्काळ, या क्षणापासून. कदाचित येणाऱ्या पिढीला हा निराळा, निसर्ग बागायला मिळणार ही नाही.


मित्रानो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या काळात आपण सदृढ राहणार असाल तर आता आपल्याला निसर्गाची मदत करावी लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर, तुम्हाला माहीतच आहे, निसर्ग खवळला की तो कुणालाही सोडत नाही! तो कुणाचा धर्मही पाहत नाही. तो फक्त संपवून टाकतो. तेही एका क्षणार्धात!


त्यासाठी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वापरू नका, झाडे लावा - हवा स्वच्छ होईल, पुरापासून सवरक्षण मिळेल, पाणी जिरवा - भुतालची पाण्याची पातळी वाढेल, जमीन थंड राहण्यास मदत होईल.


आता आला आहे पावसाळा,
धरा ध्यास मनाला,
एक संग व्हा आता,
झाडे लावा आणि पाणी जिरवा,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।

असे हे रंगबिरंगी जग,
नाही भेटणार दुसरे,
निसर्ग सौंदर्य परत मिळवण्यासाठी,
गरज आहे सध्या एकजुटीची,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।


प्रशांत सुरेश देवमोरे

  • जर लेख आवडला असेल तर मित्रानो subscribe करा...



Latest article

What are the pros and cons of web hosting companies in Marathi?

2019 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब होस्टिंग सुविधा कोणती कंपनी देते? जगभरातील सर्वोत्तम वेब होस्टिंग कंपन्यांची  तपशीलवार माहिती आणि त्यांचे फा...